बुधवार, २२ एप्रिल, २०१५

रक्तदान


नोंदणी का करावी?

             ह्याचा अनुभव मला काही दिवसांन पूर्वी आला. नोंदणी केली की इवेन्टसचे अपडेट पाठवणे हा कोणत्याही ग्रुपचा पहिला भाग असणारच त्याला मार्केटिंग म्हणता यॆइल. पण आपण दिलेल्या माहिती मधील रक्तगटाची नोंद फार महत्वाची ठरते. ऑफिस मध्ये असताना अचानक फोन खणखणला समोरून विचारणा झाली “आप प्रितम बोल रहे है क्या?” मी हो म्हणताच, पुन्हा प्रश्न “आप का ब्लड ग्रुप B- है क्या?” माझा होकार मिळताचं पुन्हा काळजीने केलेला प्रश्न! क्या आप ब्लड डोनेट करनें आ सकते है? ऑफिस मध्ये होतो म्हणून कुठे आणि कधी यायचं विचारलं. पलीकडला काळजीचा सूर चिंतेत बदलला होता. त्यांनी लीलावती हॉस्पिटल सांगितले आणि जमल्यास आज यायला जमेल का? असेही विचारले म्हणून विचारले, होकार देऊ कि नकार हे ऑफिस मध्ये असल्यावर समजत नाही, पण तोंडाने मनाचा होकार दिलाच होता. फोन ठेवला आणि मग लक्षात आले एच. आर. ला काय सांगू!!!!!!!!!!

            आय. टी. वाल्यांचे ते एक बरे असते आम्हाला काम खूप असते आणि त्यातले कोणाला काही समजत नाही. मग लगेचच एक काल्पनिक काम माझ्या लक्षात आले. बांद्राला आलो आणि तिकडून हॉस्पिटलच्या खाली उभे असताना त्यांना फोन केला. त्यांनी तिसऱ्या माळ्यावर या असे सांगितले. इकडे आल्यावर मला हॉस्पिटल पेक्षा हॉटेल मध्ये आल्याचा अनुभव जास्त आला. तिसऱ्या माळ्यावर हॉस्पिटलची ब्लड बँक आहे. मी त्यांना ओळखत नसल्याने पुन्हा फोन केला तर साधारण पस्तीस-चाळीशितील व्यक्ती समोर आली. आप प्रितम हो? मी हो म्हंटले. त्यांच्या चेहऱ्यावर माझे आभार कसे मानावेत ह्याचे भाव स्पष्ट दिसत होते. मी म्हंटले मला परत ऑफिसला जायचे आहे तर आपण जरा ……………… आम्ही फॉर्म भरायला आलो.

प्राथमिक नोंदणी आणि इतर गोष्टी झाल्या. सगळे आटोपून मुव्ही पाहायला आलो अशा थाटात एका अलिशान खुर्चीवर मला जवळजवळ झोपवलच होत आणि दिसायला सुंदर अशी मुलगी (सिस्टर म्हणणार नाही) दाभणनुमा सुई घेऊन टोचताना लागणारी कळ चेहऱ्यावर दिसू न देत मी शांत पडून राहिलो.

             पुढची प्रोसेस नेहमी प्रमाणेच झाली आणि मी लागलीच निघायची तयारी केली. रक्तदान ह्या आधी पण केले आहे. पण कोणी अनोळखी व्यक्तीने असे फोन करून नव्हते बोलावले. आता त्यांनी मला सांगितले कि त्यांचे वडील आजारी होते आणि त्यांना रक्ताची गरज होती. गरज, काळजी, आनंद, असे तिन्ही भाव एकदाच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले मला दिसले आणि माझ्या मनाला एका आत्मीयसुख मिळाल्याचा भास झाला.
  
            ह्या गोष्टीला तसे खूप दिवस झाले पण आज त्या व्यक्तीचा पुन्हा फोन आला होत हे सांगायला कि त्यांचे वडील आता घरी आले आहेत आणि त्यांची तब्येत देखील सुधारली आहे. आश्चर्य म्हणजे मला अजून देखील त्या व्यक्तीचे नाव नाही माहित. गरजपण नाही वाटली मला त्याची "माणुसकी" हे एकाच नाव ह्याला शोभेल असे आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा